शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र मराठी माणसाच्या बापाचाच! इथे कुणी वेडंवाकडं वागायचा प्रयत्न केला तर...- राज ठाकरे
2
"आता दुकाने नाही शाळाच बंद करेन"; त्रिभाषा सूत्रावरुन राज ठाकरेंनी सरकारला दिला इशारा
3
वैभव सूर्यवंशीच्या 'त्या' कृत्यामुळे मोठा गोंधळ; विराट कोहलीचे चाहते प्रचंड संतापले, कारण...
4
"जो भारताचा नागरिक नाही...", बंगालमधील दुर्गापूरमध्ये पंतप्रधान मोदींची सभा; घुसखोरांना इशारा दिला
5
भाजपा आमदाराच्या काकांना पालिका कर्मचाऱ्यांकडून लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण, कारण काय?  
6
करुण नायरला दोन्ही टेस्टमध्ये संधी मिळेल! फ्लॉप शोनंतरही कोचला त्याच्यावर 'भरवसा'
7
"विधिमंडळात हे माझे ३६वे वर्ष, पण एवढ्या वर्षात..."; जयंत पाटील यांना नेमकी कसली खंत?
8
काल युद्धाचा इशारा, आज राजधानी सोडून पळून गेले... सिरियाचे राष्ट्राध्यक्ष अल-शारांचा अजब कारभार
9
नारायणपूरमध्ये सुरक्षा दलांना मोठे यश, चकमकीत ६ नक्षलवादी ठार
10
IND vs ENG ...तर रिषभ पंतला प्लेइंग इलेव्हनमध्ये खेळवू नका! शास्त्रींनी दिला गिल-गंभीर जोडीला सल्ला
11
ITI प्रवेशासाठी 'अनुसूचित जाती' व 'अल्पसंख्याक'चा दुहेरी लाभ घेणाऱ्यांवर होणार कारवाई
12
Dukes Ball Controversy : विषय हार्ड! चेंडूच्या क्वॉलिटी संदर्भातील मुद्द्यावर कंपनी घेणार रिव्ह्यू
13
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
14
भीषण अपघातात ट्रकखाली चौघे शंभर फूट फरफटत गेले, पित्यासह दोन चिमुकल्यांचा मृत्यू
15
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
16
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
17
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
18
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
19
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
20
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक

सावरकर साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी नेने-- २० ते २२ एप्रिलअखेर सांगलीत बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 30, 2018 23:46 IST

सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार

ठळक मुद्देविविध कार्यक्रमांचे आयोजन

सांगली : स्वा. सावरकर अभ्यास मंडळ (मुंबई), सावरकर प्रतिष्ठान (सांगली) व सावरकरप्रेमी मंडळ (मिरज) यांच्यावतीने सांगलीत आयोजित करण्यात आलेले ३० वे स्वातंत्र्यवीर सावरकर साहित्य संमेलन यशस्वी करण्याचा निर्धार नागरिकांनी व्यक्त केला. दि. २० ते २२ एप्रिलअखेर होणाऱ्या या संमेलनात समाजातील प्रत्येक घटकाला सामावून घेण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत.

सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी विश्रामबाग येथील दांडेकर हॉलमध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी आ. सुधीर गाडगीळ, आ. सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.

सुरूवातीला बाळासाहेब देशपांडे यांनी संमेलनाची रूपरेषा व त्याच्या तयारीसाठी करण्यात येणाºया समित्यांची माहिती दिली. त्यानंतर माधवराव कुलकर्णी यांनी समित्यांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन केले. सावरकर प्रतिष्ठान प्रशालेच्या प्रांगणात होणाºया या संमेलनात पहिल्या दिवशी २० एप्रिल रोजी दुपारी चारपासून ग्रंथदिंडी, शोभायात्रेचे आयोजन करण्यात आले आहे. या शोभायात्रेनंतर प्रेरणा लांबे यांचे ‘मी येसुबाई बोलतेय’ या विषयावर, गीता उपासनी यांचे ‘सहा सोनेरी पानांचा इतिहास’ या विषयावर आणि शंतनू रिठे यांचे ‘आज सावरकर असते तर’ या विषयावर व्याख्यान होणार आहे. विश्रामबाग येथील शोभायात्रा यशस्वी करण्याची जबाबदारी शेखर इनामदार यांनी घेतली, तर गावभाग येथील शोभायात्रेची जबाबदारी भारती दिगडे यांनी घेतली.

मिरज येथील शोभायात्रेसाठी सुधीर गोरे व संजय धामणगावकर यांनी सहकाºयांसह योगदान देणार असल्याचे सांगितले. उर्वरित कार्यक्रम पुढील बैठकीत निश्चित केले जाणार आहेत.संमेलनामध्ये दोन दिवस पूर्णवेळ उपस्थित राहावे, आपल्याबरोबर किमान दोन प्रतिनिधी सहभागी करावेत, संमेलनात युवकांचा सहभाग वाढवावा व निधीच्या संकलनासाठी पुढाकार घेण्याचे आवाहन संयोजकांनी केले.जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख यांनी, संयोजन समितीकडून जी द्याल ती जबाबदारी समर्थपणे पार पाडली जाईल असे सांगितले. यावेळी बापूसाहेब पुजारी, विलास चौथाई यांच्यासह इतरांनीही आपली मते व्यक्त केली.मंत्री, खासदार, मान्यवरांची उपस्थितीसंमेलनाच्या मुख्य दिवशी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहीर, तर समारोपाला शिक्षणमंत्री विनोद तावडे यांची उपस्थिती असणार आहे. संमेलनाच्या अध्यक्षस्थानी दा. वा. नेने, तर सोलापूरचे खा. शरद बनसोडे उद्घाटक आहेत. संमेलनास खा. अमर साबळे, प्रदीप रावत, दत्तात्रय शेकटकर, भाऊ तोरसेकर, यमाजी मालकर, रवींद्र गोयल आदी उपस्थित राहणार असल्याचे संयोजकांनी सांगितले.सावरकर साहित्य संमेलनाच्या नियोजनासाठी शुक्रवारी सांगलीतील विश्रामबाग येथे बैठक झाली. यावेळी आमदार सुधीर गाडगीळ यांनी मार्गदर्शन केले. यावेळी शेखर इनामदार, आमदार सुरेश खाडे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष संग्रामसिंह देशमुख, बाळासाहेब देशपांडे, विलास चौथाई आदी उपस्थित होते.